# मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बोरगाव ग्रामपंचायतीकडून ५ वनराई बंधाऱ्यांची उभारणी – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बोरगाव ग्रामपंचायतीकडून ५ वनराई बंधाऱ्यांची उभारणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बोरगाव ग्रामपंचायतीकडून ५ वनराई बंधाऱ्यांची उभारणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून बोरगाव ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे श्रमदानातून पाच वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. यामध्ये बोरगाव गावात तीन, तर चिखली व खरूडे येथे प्रत्येकी एक असे एकूण पाच बंधारे उभारण्यात आले.
पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढविणे व शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कामासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या उपक्रमावेळी सरपंच अशोक गवळी, ग्रामसेवक सुकदेव बागुल, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. श्रमदानातून साकारलेले हे वनराई बंधारे जलसंधारणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार असून ग्रामविकासाला चालना देणारे ठरतील, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!