# अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करा, तहसीलदार रामजी राठोड  – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करा, तहसीलदार रामजी राठोड 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करा, तहसीलदार रामजी राठोड

सुरगाणा तालुक्यात माहे सप्टेंबर २०२५ व त्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत बाधित शेतकरी/लाभार्थी यांची ई-केवायसी प्रलंबित असून, संबंधित गावनिहाय प्रलंबित लाभार्थ्यांची एक्सेल फाईल उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या एक्सेल फाईलमधील सर्व शेतकरी/लाभार्थ्यांनी आजच आपल्या नजीकच्या महा-ई सेवा केंद्रावर जाऊन तात्काळ ई-केवायसी पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. ई-केवायसी पूर्ण न झाल्यास शासकीय मदतीच्या प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता आहे.
सदर सूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत सहा. कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी समन्वय साधून संबंधित लाभार्थ्यांना तात्काळ माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
ही कारवाई मा. तहसीलदार, सुरगाणा यांच्या निर्देशानुसार करण्यात येत असून, सर्व बाधित शेतकऱ्यांनी विलंब न करता ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!